"फँड्री फाउंडेशन" चे सुरवातीपासूनचे एक
मुख्य हितचिंतक श्री. अजय बिरवटकर प्रमुख सल्लागार असलेल्या खेड
(रत्नागिरी) भागातील "स्नेह ज्योती' या अंध विद्यार्थ्यांसाठी असलेल्या
निवासी शाळेला भेट देण्याची संधी अजय दादांनी "फँड्री फाउंडेशन" च्या
स्वयंसेवकांना दिली आणि ती अतिशय आनंदाने स्वीकारली. "फँड्री फाउंडेशन"
च्या मुंबईतील २५ व रत्नागिरी टीमच्या २ स्वयंसेवकांनी या संधीचा लाभ
घेतला.
२५ जानेवारी २०१६ रोजी आम्ही सकाळी १०.३० च्या सुमारास खेड मंडणगड रस्त्यावरील घराडी या गावातील "स्नेहज्योती" या अंध मुलांच्या निवासी शाळेत पोहोचलो. सुरवातीलाच एक सूचना फलक दिसला त्यातील सूचना व्यवस्थित वाचल्या कारण आम्ही साधारणपाने जे काम करायला आदिवासी पाड्यात जातो त्यापेक्षा हे काम वेगळे होते. मुख्य म्हणजे आम्ही येथे काही शिकवायला किंवा द्यायला आलो नव्हतो तर एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय नसलेल्या परंतु तरीही त्याची उणीव जाणवून न देणाऱ्या अशा बालवीरांकडून शिकण्यासाठी, त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासाठी आलो होतो. ज्या गोष्टी आपल्या कडे नाहीत त्याचे दुखः कवटाळून बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा कसा वापर करावा ही गोष्ट या मुलांकडून शिकण्यास मिळाली. आपल्याकडे असलेल्या Resources चा पुरेपूर उपयोग कसा करावा आणि आपले काम पुढे कसे न्यायचे याचा विचार करण्यासाठी ही बाब खूप महत्वाची आहे. ४ तासांच्या सहवासामध्ये त्यांच्या निरागस चेहेऱ्यावरील निरागस स्मित आपल्याला आपल्या आयुष्यातील दुखः किती शुल्लक असतात याची जाणीव करून दिली. दृष्टी असून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची दृष्टी आपल्यात नाही याची जाणीव झाली.
आशाताई कामत यांचा वयाच्या ७४ व्या वर्षी काम करण्याचा जो उत्साह आहे तो आमच्यासाठी निश्चितच स्फूर्तीदायक होता. शाळेतील सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापिका सेनगुप्ता यांची निरालस सेवा आपल्या सर्व स्वयंसेवकांमध्ये एक सकारात्मक बदल घडवेल याची निश्चिती.
२६ जानेवारी ला सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमात आयोगाचे अध्यक्ष असलेल्या माननीय दादासाहेब इदाते संचालित असोंड येथील आश्रम शाळेला आमचा स्नेही नंदेश खेडेकर याच्यामुळे योग आला. या शाळेत भटक्या जमातीची सुमारे १३५ मुले व मुली शिक्षण घेत आहेत. या मुलांचा सभाधीटपणा लगेच लक्षात येत होता. अनोळखी व्यक्तीशी बोलताना जो एक बुजरेपणा असतो तो नावालाही नव्हता. आमच्या स्वयंसेवकांबरोबर त्यांची लगेचच गट्टी झाली.
त्यांच्या बरोबर २ तास कधी संपले ते लक्षात देखील आले नाही.
या भेटीच्या तयारीची जबाबदारी दिलेल्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पू (पूनम यादव) हिने तिच्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय उत्कृष्टतेने पार पाडली. तिच्या कामाचे एका इंग्रजी म्हणी द्वारे वर्णन करेन "Talk Less Do More"
आपल्या अमोघ वकृत्व शैली आणि ज्ञानाने आम्हाला या मुलांच्या विश्वाची माहिती करून देण्याऱ्या स्नेह ज्योतीचे सचिव म्हणून काम पाहणारे माननीय श्री उत्तमकुमार जैन यांचे विशेष आभार
शेवटी महत्वाचे - आम्हाला ही संधी देणाऱ्या आमच्या लाडक्या अजय दादांचे आमच्यावरील प्रेम असेच वृद्धिंगत होवो.
२५ जानेवारी २०१६ रोजी आम्ही सकाळी १०.३० च्या सुमारास खेड मंडणगड रस्त्यावरील घराडी या गावातील "स्नेहज्योती" या अंध मुलांच्या निवासी शाळेत पोहोचलो. सुरवातीलाच एक सूचना फलक दिसला त्यातील सूचना व्यवस्थित वाचल्या कारण आम्ही साधारणपाने जे काम करायला आदिवासी पाड्यात जातो त्यापेक्षा हे काम वेगळे होते. मुख्य म्हणजे आम्ही येथे काही शिकवायला किंवा द्यायला आलो नव्हतो तर एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय नसलेल्या परंतु तरीही त्याची उणीव जाणवून न देणाऱ्या अशा बालवीरांकडून शिकण्यासाठी, त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासाठी आलो होतो. ज्या गोष्टी आपल्या कडे नाहीत त्याचे दुखः कवटाळून बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींचा कसा वापर करावा ही गोष्ट या मुलांकडून शिकण्यास मिळाली. आपल्याकडे असलेल्या Resources चा पुरेपूर उपयोग कसा करावा आणि आपले काम पुढे कसे न्यायचे याचा विचार करण्यासाठी ही बाब खूप महत्वाची आहे. ४ तासांच्या सहवासामध्ये त्यांच्या निरागस चेहेऱ्यावरील निरागस स्मित आपल्याला आपल्या आयुष्यातील दुखः किती शुल्लक असतात याची जाणीव करून दिली. दृष्टी असून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची दृष्टी आपल्यात नाही याची जाणीव झाली.
आशाताई कामत यांचा वयाच्या ७४ व्या वर्षी काम करण्याचा जो उत्साह आहे तो आमच्यासाठी निश्चितच स्फूर्तीदायक होता. शाळेतील सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापिका सेनगुप्ता यांची निरालस सेवा आपल्या सर्व स्वयंसेवकांमध्ये एक सकारात्मक बदल घडवेल याची निश्चिती.
२६ जानेवारी ला सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रीय भटक्या विमुक्त जमात आयोगाचे अध्यक्ष असलेल्या माननीय दादासाहेब इदाते संचालित असोंड येथील आश्रम शाळेला आमचा स्नेही नंदेश खेडेकर याच्यामुळे योग आला. या शाळेत भटक्या जमातीची सुमारे १३५ मुले व मुली शिक्षण घेत आहेत. या मुलांचा सभाधीटपणा लगेच लक्षात येत होता. अनोळखी व्यक्तीशी बोलताना जो एक बुजरेपणा असतो तो नावालाही नव्हता. आमच्या स्वयंसेवकांबरोबर त्यांची लगेचच गट्टी झाली.
त्यांच्या बरोबर २ तास कधी संपले ते लक्षात देखील आले नाही.
या भेटीच्या तयारीची जबाबदारी दिलेल्या आमच्या सर्वांच्या लाडक्या पू (पूनम यादव) हिने तिच्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय उत्कृष्टतेने पार पाडली. तिच्या कामाचे एका इंग्रजी म्हणी द्वारे वर्णन करेन "Talk Less Do More"
आपल्या अमोघ वकृत्व शैली आणि ज्ञानाने आम्हाला या मुलांच्या विश्वाची माहिती करून देण्याऱ्या स्नेह ज्योतीचे सचिव म्हणून काम पाहणारे माननीय श्री उत्तमकुमार जैन यांचे विशेष आभार
शेवटी महत्वाचे - आम्हाला ही संधी देणाऱ्या आमच्या लाडक्या अजय दादांचे आमच्यावरील प्रेम असेच वृद्धिंगत होवो.